शेतकरीविरोधी विधेयकाच्या विरोधात किसान सभा रस्त्यावर; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
शेतकरीविरोधी विधेयकाच्या विरोधात किसान सभा रस्त्यावर; केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
माजलगाव : केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले शेतकरीविरोधी विधेयके आणि वीज बिल कायद्यातील बदलाचे अध्यादेश संसदेत पास केलेल्या आहेत. या नवीन बिलांना आणि विधेयकांना मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यासाठी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शनाची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितिच्या वतीने देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शारीरिक अंतर राखून आणि कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करत नित्रुडमध्ये माजलगाव तेलगाव महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
Read सौदी अरेबियात भारतीय फ्लाइट्सवर बंदी
[Beed Parshwabhoomi,Parshwabhoomi Marathi News Paper Beed,Marathi News paper in Beed,News paper Beed, News Paper in Beed Maharshtra,]
शेतकरी विरोधी तिन्ही विधेयक तात्काळ रद्द करा,नवीन वीज विधयेक 2020 आणि पर्यावरण संबधी अधिसूचना रद्द करा, अतिवृष्टीने पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या,उसतोड़ कामगारांना दरवाढ देणारा नवीन करार करा,शेतकऱ्यांना विनाअट पिक कर्ज द्या,पेट्रोल डिझलची प्रचंड झालेली दरवाढ कमी करा, इत्यादी मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी श्री.पुराणिक यांना देण्यात आले.
Read रिलायंस रिटेलमध्ये केकेआरची ५५०० कोटींची गुंतवणूक
या वेळी कॉ सुभाष डाके, संदीपान तेलगड, सय्यद रज्जाक, जनक तेलगड, रामा राउत, बाबासाहेब डाके, अशोक तातोड़े, ऍड अशोक डाके, पोपट गायकवाड, पांडुरंग उबाळे, नारायण तातोडे, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा