धनंजय मुंडे - परळीला साधा वळण रस्ता आणू शकल्या नाहीत



केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील परळी शहरासाठी साधा वळण रस्ता सुद्धा आणू शकल्या नाहीत, अशी टीका मंत्री धनंजय मुंडे [Minister Dhananjay Munde] यांनी पंकजा मुंडे [Pankaja Munde] यांच्यावर केली आहे. आज परळी बायपासचे उद्घाटन करण्यात आले. 

परळी परिसरातील अनेक नागरिकांची परळीला बायपास रस्ता असावा अशी मागणी होती. तत्कालीन सरकारमध्ये पाच वर्ष असताना देखील त्यांना हे करता आले नाही. आमदार झाल्या झाल्या मी सात महिन्यात या रस्त्याला मंजुरी आणली आणि 78 कोटी रुपये यावर खर्च होणार आहे, याचा मला आनंद असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. 

आज परळी बायपास रस्त्याचे मंत्री धनंजय मुंडे [Minister Dhananjay Munde] यांनी भूमिपूजन केले.