कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना कोणत्या गावाला मिळणार वाचा सविस्तर



राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरु केली आहे.


गुणांकनासाठीचे निकष व कमाल गुण :  

ग्रामपंचायत स्तरावर 5 पथकांनी नेमून दिलेली कार्ये नियमितपणे करायची आहेत. त्याआधारे ग्रामपंचायतीने खालील निकषांनुसार गुणांकन करणे व ग्रामपंचायतीचे स्वयंमूल्यांकन करून ते गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचे आहे. विविध 22 निकषांवर 50 गुणांचे मूल्यांकन केले जाणार आहे.


स्पर्धेचे 22 निकष : (गुणांकन)

1) कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे.(2)

2) पथकांची निर्मिती करणे.(2)

3) कोरोनाबाधित गावांचे सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे.(4)

4) गावपातळीवर अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करणे.(4) 

5) बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल करणे.(2) 

6) लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण केंद्रात ठेवणे.(2) 

7) यासाठी अल्पदरात वाहनव्यवस्था करणे.(2)  

8) विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करणे, शौचालयाची नियमित स्वच्छता.(2)  

9) गावातील खासगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सक्रीय सहभाग घेणे, लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्मितीसाठी आहारविषयक मार्गदर्शन.(2) 

10) कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह असल्यास पथकातील स्वयंसेवकांमार्फत मदत करणे.(2) 

11) शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटीव्ह आल्यास त्यांच्याकडील उत्पादित दूध व भाजीपाला हे अनुक्रमे दूध डेअरी व मार्केटला स्वयंसेवकांमार्फत पोहोच करणे.(2) 

12) सहकारी संस्था, बचतगट यांचा सहभाग घेणे.(2) 

13) कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे.(2) 

14) कोरोनाविरहित कुटुंबांची नोंद ठेवणे व काळजी घेणे.(2)

15) संबंधित पथकातील स्वयंसेवकांमार्फत बाधितांच्या उपचारासाठी व्यवस्था करणे.(2)   

16) लसीकरणासाठी मदत करणे, उपलब्ध लसीचे शासकीय नियमानुसार योग्य वाटप करणे(2) 

17) लहान बालकांचे, गरोदर महिलांचे सर्वेक्षण करणे.(2) 

18) जनजागृतीसाठी विविध प्रभावी उपाययोजना, विविध तंत्रज्ञानाचा वापर.(2) 

19) नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य ती खबरदारी घेणे(2)

20) मृत्यूदर कमी असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न.(2) 

21) पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे.(2) 

22) कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झालेल्या अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणे. (4) 


स्पर्धेसाठी ग्रामपंचायतींची कर्तव्ये :  

1 जून 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येईल.

1) प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक.

2) विलगीकरण कक्ष स्थापना व कार्यवाही पथक.

3) रुग्णालयांसाठीचे वाहन चालकाचे पथक.

4) कोविड हेल्पलाईन पथक. 

5) लसीकरण पथक. 


स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येक महसूल विभागात पुढील प्रमाणे बक्षिसे व गावांच्या विकासासाठी निधी दिला जाणार.

पुरस्कार

प्रथम 

50 लाख + 50 लाख = 1 कोटी 

द्वितीय 

25 लाख + 25 लाख = 50 लाख 

तृतीय 

15 लाख + 15 लाख = 30 लाख