दोन्ही सरकार दोषी आहेत – प्रकाश आंबेडकर



केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य वेळी भूमिका न घेतल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकल नाही. यासाठी दोन्ही सरकार दोषी आहेत, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.


मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गरीब मराठा विरुद्ध श्रीमंत मराठा असा आहे. मी ही भूमिका घेतली होती आणि ती पटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. आता मात्र माझी भूमिका सगळ्यांना पटत असल्याचे दिसत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, असे आंबेडकर म्हणाले.