🌾 पिक कर्जासाठी शेतकर्‍यांना बेबाकी व फेरफारची आवश्यकता नाहीच -आ.पवार

🌾 पिक कर्जासाठी शेतकर्‍यांना बेबाकी व फेरफारची  आवश्यकता नाहीच  -आ.पवार

शेतकर्‍यांचा खरिप हंगामा सुरू झाला आहे त्यामुळे शेतक-यांनी पिक कर्जासाठी बँकेत व तहसील कार्यालयात गर्दी होत आहे, कोरोनोच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी फेरफार घेऊ नये म्हणून आदेशीत केले आहे तरी सुध्दा बँकेचे आधिकारी शेतक-यांना फेरफारची मागणी करत आहेत. तरी या पुढे शेतक-यांना फेरफार देणे आवश्यक नाही

जर बँकेला फेरफार आवश्यक असेल तर बँकेने तहसील कार्यालयात मागणी करतील त्यामुळे शेतकर्‍यांनी फेरफारसाठी गर्दी करू नये तसेच पिक कर्जासाठी शेतक-यांना बेबाकी प्रमाणपञाची गरज लागणार नसल्याचे आ.पवार यांनी बँक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकी दरम्यान बोलताना सांगितले. गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक कर्जासाठी अडचणी संदर्भात तहसील कार्यालयात आ.लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत आज दि.11 रोजी बैठक संपन्न झाली.

यावेळी तहसीलदार प्रशांत जाधवर, ना.तहसीलदार भगवानराव खेडकर, गटविकासाधिकारी बागुल,कृषी आधिकारी संजयकुमार ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, दादासाहेब गिरी, यांच्यासह तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक