💥 कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या


केज : नापिकी आणि पत्नीच्या आजारपणातील कर्जाला कंटाळून एका शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

भगवान साधू गवळी (रा.केज) यांनी शेतातील नापिकी आणि पत्नीच्या आजारपणातील उपचारासाठी लोकांचे घेतलेले हातउसने पैसे याच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. 5 जून रोजी केज शिवारातील मोळपट्टी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयताचा मुलगा गणेश भगवान गवळी यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला फौजदारी संहिता 174 प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहेत.