'ऑनलाइन' मुलांची पालकांना चिंता!



डॉ. राजीव मेहता (बालरोग-मानसोपचारतज्ज्ञ)

आजच्या या डिजीटल युगाचे आम्ही 'डिजीटल नागरिक' आहोत. 'डिजीटल' आणि 'स्मार्ट' हा देखावा राहिलेला नाही. काळाची गरज आहे, हे आपल्या सर्वांना आज पटलेले आहे. तरीही प्रश्न पडतो, आजची युवा पिढी 'सोशल मिडिया' चा इतका उपयोग का करते आहे ? अगदी इतका की त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याचेही त्यांना भान राहत नाही. याची काही प्रमुख कारणे आहेत.

या कारणांमध्ये जगामध्ये माझी स्वत:ची एक ओळख आहे हे व्यक्त करण्यासाठी, स्वत:बद्दल माहिती व भावनांना वाव मिळतो. मी कसाही असेल, परंतु दुसऱ्यांना प्रभावीत करण्यासाठी स्वत:ची आकर्षक प्रतिमा मांडण्याचे ते हक्काचे साधन वाटते. मैत्रीचे वलय वाढविण्यासाठी, आत्मसंतुष्टी मिळवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग होतो. 'मला माझ्या मित्रांनी एकटे टाकले आहे. मला कुणीच ग्रुपमध्ये येऊ देत नाही. मला मित्रांची गरज आहे आणि या प्लॅटफॉर्मवर शेकडो मित्र मला मिळाले आहेत,' ही तीव्र जाणीव. माझे हे सर्व मित्र नेहमीच मला 'अरे वा ' म्हणतात. आणि मला ते सर्व २ वडतात, ही समजतू. एकटेपणामध्ये मला हे सर्व उचलून धरतात. ज्याकडे आई-बाबा, आजोबा-आजी लक्ष देत नाहीत, अशा माझ्या प्रत्येक गोष्टीला, माझे सर्व मित्र 'थम्स अप' देतात, ही जाणीव आदींचा समावेश असतो. युवा पिढीला वारंवार सांगूनसुध्दा या सोशल मीडियाचा धोका


कळत नाही. अनेक युवक ऑनलाईन गुंडगिरीला (सायबर बुलिंग) बळी पडताहेत.

आजची पिढी स्वत:मध्येच जगत आहेत. याची प्रचीती आम्हाला वेळोवेळी येते. अनेकदा ही मुले नकळत यात ओढली जातात. यामुळे अन्य साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, याची जाणीव त्यांना नसते. त्याहून जास्त काळजीचे कारण म्हणजे, मुले आपले 'स्व' सोडून प्रत्यक्षपासून अप्रत्यक्षाकडे ओढली जात आहेत. अशा स्थितीत पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या सद्यस्थितीतील बदलांकडे, धोक्यांकडे, संकेतांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या सर्व गोष्टींना बळी पडायच्या आत आम्हाला त्यांना प्रत्यक्षात ; वास्तवात आणणे अत्यावश्यक आहे. अशा स्थितीत खालील "रेड फ्लॅग साइन्स' कडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे

मुलांची ऊर्जा वा ऊर्जापातळीत, बदल दिसणे.

* त्यांच्या रोजच्या कामांमध्ये व्यत्यय येणे. कामांत सहभाग कमी होणे.

* नियमित कामांना लागणारा वेळ वाढणे. जाणवण्याइतपत वर्तन बदललेले दिसणे.

* जेवणातील रस कमी होणे.

* खूप जास्त मुडी होणे. क्षुल्लक गोष्टींकडे चिडचिड करणे.

* झोप अगदी कमी होणे वा खूप जास्त झोपणे. सकाळी डोळे सुजलेले दिसणे.

अशा वेळी मुलाची नव्या जगाची आकलनशक्ती आणि पालकांची विवेकबुध्दी दोन्हींची परस्पर देवघेव होणे गरजेचे आहे. आजच्या या सामुहिक - अप्रत्यक्ष विश्वास आपले पाल्य हरवणार नाही, यासाठी पालकांनी सतत जागरूक राहणे आवश्यक ठरते.