राणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती – हसन मुश्रीफ



छत्रपती शाहू महाराजांची ही पुण्यभूमी आहे. जगाला समतेचा संदेश शाहू महाराजांनी दिला. रयतेसाठी खजिना रिता करणारे शाहू महाराज होते. मराठा समाज फक्त राजकीय आरक्षण मागत नाही. आम्ही जी चूक केली. 


तीच चूक युती सरकारनेही केली. आयोग न नेमता समिती नेमून आरक्षण दिलं, असं सांगतानाच राणे समिती नेमली ही आमची सर्वात मोठी चूक होती, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी कबूल केलं.एकमेकांच्या चुकांकडे लक्ष न वेधता, मराठा समाजाच्या मागण्या कशा पूर्ण करता येतील यावर लक्ष केंद्रीत करू, असं आवाहनही त्यांनी केलं.