बीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गायब - जयदत्त क्षीरसागर



बीड : विकास कामांसाठी आलेला निधी गावांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत जाणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात मात्र तसे होत नाही, अशी तक्रार शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त

क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. (Development funds coming to Beed district do not reach the villages; Kshirsagar's complaint to Chief Minister Uddhav Thackeray) शनिवारी (ता. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या निवडक नेत्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधला. यावेळी क्षीरसागर यांनी विविध मुद्दे मांडले. त्यांनी विकास कामांच्या निधीवरुन चांगलाच बॉम्ब टाकला.

ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी खेळू नका 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील सत्तासमिकरणांत शिवसेनेचा एक गट कायम दुर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे असून दोघेही पुर्वी राष्ट्रवादीत असताना एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जात. (Ex Minister Shivsena Leader Jaydatta Kshisrsagar Beed) आता जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणेच बीड विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने या मतदार संघातील विकास कामे, निधी वाटपात संदीप क्षीरसागर यांच्याच शिफारशींना स्थान आहे.

बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे कधी उघडणार ? 

त्यामुळे राज्यातील व जिल्ह्यातील नव्या सत्तासमिकरणा नंतर जयदत्त क्षीरसागर दुरच आहेत. त्यामुळे संधी मिळताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच तक्रार केली. (Chief Minister Uddhav Thackeray) मराठा आरक्षण नक्कीच द्यायला हवे, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

मी नेमकी कितवी पत्नी करुणा मुंडे केला मोठा खुलासा वाचा सविस्तर 

मराठवाड्यासाठी 152 TMC पाणी मिळावे. मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. हा प्रकल्प मराठवाड्याचे भाग्य बदलू शकतो. संथगतीने सुरु असलेल्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात 1600  कोटींचा खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून आतापर्यंत केवळ 94 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. याबाबत बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, विकास कामासाठी आलेला निधी थेट गावापर्यंत जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या पालखली सोहळ्याला मर्यादित वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महावितरण कंपनीकडून बीड नगरपालिकेला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. पथदिव्यांचे वीज देयक इतर शहरांपेक्षा चार पट आकारले जाते. शहरात अमृत अटल आणि भुयारी गटार योजनेचा निधी वेळेवर मिळत नसल्याने काम संथगतीने सुरु असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगीतले.