कन्हैय्या हॉटेलमध्ये विवाह ; वधुवरासह 300 जणांवर गुन्हा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला.
याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स येथे विवाह सोहळ्यासाठी मोठी गर्दी झाली असल्याची माहिती नेकनूर पोलीसांना मिळाली.
धारुर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होता. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे यावेळी उल्लंघन करण्यात आले.
त्यामुळे ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून वधु-वर, त्यांचे आई-वडील, मामा, देवबप्पा, हॉटेल मॅनेजर यांच्यासह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा