गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात वांगी व परिसरातील शेतकर्यांनी लावलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावात जाणार्या पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला. यावेळी तहसीलदार श्रीकांत निळे यांना सोबत घेवून त्या ठिकाणी जावून तात्काळ पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी महसूलच्या अधिकार्यांना दिल्या. बीड तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वांगी व परिसरातील शेतकर्यांनी लावलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व गावात जाणार्या पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यात वाहून गेला असून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांना सोबत घेत वांगी व परिसरातील शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानीच्या व परिस्थितीची पाहणी केली आणि थेट पंचनामे करण्यास महसूलच्या अधिकार्याना सूचना केल्या. यावेळी गावातील ग्रामस्थांची उपस्थित होती.
टिप्पणी पोस्ट करा