💥 भारताचा पलटवार चीनच्या पाच जवानांचा खात्मा


💫 लडाख सीमेवर झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने चोख प्रत्युत्तर देऊन चीनच्या ५ जवानांचा खात्मा करून ११ जणांना जखमी केल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे.

✨ पिपल्स लिबरेशन आर्मीचे ५ जवान मारले गेले असून ११ जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्याने सदरील घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

⚡ लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पठाणकोट दौरा रद्द केला असून भारतीय बाजूकडूनच चीनच्या हद्दीत घुसखोरी करण्यात आली होती, असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.

📍 गलवान खोऱ्यात तणाव निवळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच चीन आणि भारतीय सैन्यात हिंसक झटापट झाली.

📌 दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, वायूसेना, लष्कर आणि नौदल प्रमुख या सर्वांची बैठक बोलावली आहे.