💥 वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन


पुणे विभागामध्ये  आज (गुरुवार) १८ जून २०२० अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण ४५७ व्यक्तींचे आगमन झालेले आहे.

दुसऱ्या टप्प्यामध्ये  ७८९ व्यक्तींचे तर तिसऱ्या टप्प्यात ४२१ असे एकूण १ हजार ६६७  व्यक्तींचे आगमन झालेले आहे.

यामध्ये पुणे जिल्हयातील १ हजार ३३०, सातारा जिल्हयातील ८५ , सांगली जिल्हयातील ९४, सोलापूर जिल्हयातील ७२ तर कोल्हापूर जिल्हयातील ८७ व्यक्तींचा समावेश आहे. अशी  माहिती विभागीय आयुक्त   डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.