💥 विहिरीत उडी घेवून नवदाम्पत्याची आत्महत्या


गेवराई बातम्या : एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

सदरील घटना गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान या नवविवाहित दाम्पत्यांनी आत्महत्या केली की अन्य कोणते कारण यामागे आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे.

सुनील बाबासाहेब चव्हाण (21) व मनिषा सुनिल चव्हाण (20) रा.चव्हाणवाडी तांडा ता गेवराई जि.बीड असे विहीरीत मृतदेह आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत.

या दोघांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता असे सांगितले जाते.  दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह गावा जवळील एका शेतकर्‍याच्या विहीरीत तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

यानंतर या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना कळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पोउपनि.दिगांबर पवार, बप्पासाहेब झिंझुर्डे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

यानंतर दोघांचेही मृतदेह ग्रामस्थांच्या सहायाने बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी उमापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते.

सदरील नवविवाहित दाम्पत्यांनी आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली ? हे अद्याप स्पष्ट नाही.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर